Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

शासकीय कार्यक्रमांचे तरुण सुसंवादक

$
0
0

खासगी असो वा शासकीय कुठलाही कार्यक्रम म्हटला की गोड गळ्याचे, गोड चेह‍ऱ्याचे आणि गोडगोड बोलणारे निवेदक असणे हा आजवर जणू अलिखित नियमच झाला होता. राज्य सरकारच्या अनेक कार्यक्रमातही काही ठराविक निवेदकांची वर्णी ठरलेली असायची. पण, महाराष्ट्रात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने हा पायंडा मोडायचा निर्णय आता घेतला आहे. किमान सांस्कृतिक खात्याने तरी तसा निश्चय केलेला आहे. त्याचा प्रत्यय नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या दिवंगत शास्त्रीय गायक भीमसेन जोशी यांच्या नावाने देण्यात येणा‍ऱ्या पुरस्कार सोहळ्यात आणि मुंबईत पार पडलेल्या वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात आला. या दोन्ही महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कुणाही नामवंत निवेदकाकडे न सोपवता, सांस्कृतिक मंत्र्यांनी त्याची जबाबदारी स्थानिक कॉलेजातील तरुण विद्यार्थ्यांवर सोपवलेली होती. वास्तविक हे निवेदन जुन्या जाणत्या निवेदकांना मिळावे, याची पूर्ण तयारी झालेली होती. पण ती फेटाळत निवेदनाची जबाबदारी समजूनउमजून महाविद्यालयीन तरुण निवेदकांवर सोपवण्यात आली. खरेतर ही मोठी जोखीमच होती. कारण हे दोन्ही कार्यक्रम मानाचे होते. एक संगीत क्षेत्रातला, तर दुसरा साहित्य क्षेत्रातला. त्यामुळे तरुण निवेदक कार्यक्रम कुठल्या पातळीला घेऊन जातात, हा सगळ्यांच्या कुतूहलाचा आणि शंकेचाही विषय होता. परंतु, या दोन्ही कार्यक्रमांत तरुण निवेदकांनी कार्यक्रमाचा सुकाणू व्यवस्थित आपल्या हाती राखला आणि कार्यक्रमाची नौका सुखरूप किना‍ऱ्याला लावली.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन नामवंत आणि व्यावसायिक निवेदकांऐवजी कॉलेजात शिकणा‍ऱ्या तरुण-तरुणींना देण्याचा हा निर्णय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्वतःच्या अनुभवावरूनच घेतला. कॉलेजात असताना एका कार्यक्रमाचे निवेदन त्यांनी स्वतः केले होते. त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक द. मा. मिरासदार (योगायोगाने या वाङ्मयीन सोहळ्यात शासनाचा विंदा करंदीकर पुरस्कार द. मा. मिरासदार यांनाच देण्यात आला) उपस्थित होते आणि कार्यक्रमानंतर त्यांनी तावडे यांची पाठ थोपटून त्यांचे कौतुक केले होते. कॉलेज जीवनातील त्या एका घटनेने माझा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढल्याचे सांगत तावडे यांनी, त्या अनुभवातूनच आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

शेवटी आयुष्यात नेमक्या वेळी, नेमक्या प्रसंगी, नेमक्या वयात एक कौतुकाची थाप पाठीवर पडणे गरजेचे असते. ती योग्यवेळी पडल्यास आयुष्य छान मार्गी लागू शकते. किमान आयुष्याला योग्य दिशा मिळू शकते. नाशिक आणि मुंबई येथे पार पडलेल्या सांगीतिक आणि वाङ्मयीन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी केले, त्यांच्या आयुष्यात ही घटना आता कायमची घर करून राहील एवढे नक्की!

- रसिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>